Saturday, May 28, 2011

विचार

आज दोन दिवस झाले आजून ही मी विचारच करतोय, पुष्कळ झालं विचार करून आता लिहावच असा निश्चय करून मी लिहायला बसलोय, पण लिहू तरी काय? आजूनही मी भरकटलेलाच आहे माझ्या विचारांत, पण या आधी ही मी विचार करत होतोच की, फक्त आता मी त्यांच्या कडे लक्ष देतोय.विचारांच्या विचाराने मी खूप संभ्रमात पडलोय, खरच आपले विचार भरकटलेले आसवे का ? की आपण ज्याला भरकटलेल म्हणतोय ते भरकटलेल नाहीच , ते आपल्यालाच असं वाटतंय, प्रत्येक गोष्टी ला काही तरी एक अर्थ असतो , मग माझ्या प्रत्येक विचारला ही असायला हवा, मग ते भरकटलेल्या सारखे का वाटतात? का मलाच तसं वाटतंय.पण वाटतंय म्हणजे तरी काय, तो ही एक विचारच आहे की. काही ही असो मी विचार तरी करतोय.

मनात शेकडो विचार भरून राहिलेत, मग कश्या पासून सुरुवात करावी बर, अगदी आताच सुचलेल्या गोष्टी पासून की फार पूर्वीच्या, काही तरी सुरुवात करायला पाहिजे.

पण नेमक लिहाव तरी काय ?
मी आजूनही विचारच करतोय .........

Wednesday, May 25, 2011

भरकटलेला मी

खूप विचार करून तीन चार ओळी सुचल्यावर असं लक्ष्यात आले की मी पहिल्या ओळीच विसरलोय,नेमका मुळचा विषयच विसरल्यावर आता लिहू तरी काय?, मग पुन्हा विचार सुरु केला,"कश्यावर लिहाव बरं?"आणि पुन्हा माझी गाडी भरकटली. विचारांचं हे असच असतं,नेमके कधी भरकटतील याच नेम नसतो, कधी कुठला रोड पकडतील ,आडवाटेने कल्टी घेतील सांगता येत नाही. तसा आता ही मी थोडा भरकटलोय, मग असं भरकटलेलच का बर नको लिहू, काय वाईट आहे त्यात ,एक नव ट्राय, बघूया जमतंय का, आणि नाही जमलं तर काय फरक पडतोय भरकटलेलच तर लिहितोय, चुकलो तरी कोणी फासावर लटकवणार नाही, आही खूप चांगल लिहिलय म्हणून काही मोठा सन्मान ही होणार नाही, मग जिथे काहीच मिळत नाही असा उपदव्याप कश्या करिता. उत्तर सोपं आहे "मला माहित नाही." जसं जमेल तसं लिहिणार,जेव्हा जमेल तेव्हा लिहिणार पण काय लिहिणार ते मात्र माहित नाही आणि तसं ही भरकटलेल्या विचारांना दिशाची माहिती हवी तरी कश्याला, जसं वाहतोय तसं वाहवत जावं, मुक्त राहावं, त्यातच माझं आणि त्याचं भलं आहे.