उगाचच काहीतरी ......म्हणजे मला वाटलेलं ,नाहीत्या वेळी सुचलेल काही तरी आहे,हे काहीतरी म्हणजे काय ते आजून मला कळलेल नाही,त्यामुळे ते इतरांना काळाव आशी अपेक्षा मी करत नाही.विवध वेळी, कधी कोणाची खेचायला,कोणाला त्रास द्यायला नाहीतर इतर कोणा कारणाने उगाचच लिहिलेले हे काही तरी हे पुढे आहे , उगाचच वेळ असेल तर वाचा, नसेल तर वेळ उगाचच मिळेल तेव्हा वाचा आणि उगाचच्या उगाचच काही तरी मानून सोडून द्या .
Wednesday, May 25, 2011
भरकटलेला मी
खूप विचार करून तीन चार ओळी सुचल्यावर असं लक्ष्यात आले की मी पहिल्या ओळीच विसरलोय,नेमका मुळचा विषयच विसरल्यावर आता लिहू तरी काय?, मग पुन्हा विचार सुरु केला,"कश्यावर लिहाव बरं?"आणि पुन्हा माझी गाडी भरकटली. विचारांचं हे असच असतं,नेमके कधी भरकटतील याच नेम नसतो, कधी कुठला रोड पकडतील ,आडवाटेने कल्टी घेतील सांगता येत नाही. तसा आता ही मी थोडा भरकटलोय, मग असं भरकटलेलच का बर नको लिहू, काय वाईट आहे त्यात ,एक नव ट्राय, बघूया जमतंय का, आणि नाही जमलं तर काय फरक पडतोय भरकटलेलच तर लिहितोय, चुकलो तरी कोणी फासावर लटकवणार नाही, आही खूप चांगल लिहिलय म्हणून काही मोठा सन्मान ही होणार नाही, मग जिथे काहीच मिळत नाही असा उपदव्याप कश्या करिता. उत्तर सोपं आहे "मला माहित नाही." जसं जमेल तसं लिहिणार,जेव्हा जमेल तेव्हा लिहिणार पण काय लिहिणार ते मात्र माहित नाही आणि तसं ही भरकटलेल्या विचारांना दिशाची माहिती हवी तरी कश्याला, जसं वाहतोय तसं वाहवत जावं, मुक्त राहावं, त्यातच माझं आणि त्याचं भलं आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
waa....... suruwat tar bharich aahe .... mast kaau
ReplyDelete