प्रेमाच्या या खेळामध्ये सगळे मजनू आंधळे,
गाढवालाही फुटतात मग इश्कचे धुमारे,
म्हैस इथे सुंदर वाटे प्रत्येक रेड्याला
उपचार नाही खर सांगतो आश्या वेडाला.
प्रेमाच्या युद्धात प्रत्येक रोमियो शहीद
फायदा नाही इथे काहीच
घाट्याचा मात्र डोंगर ढीग
म्हणून म्हणतो प्रेमात पडून
नुकसान कश्याला सोसा
ढोसायची आहेच तर मग happy होऊन ढोसा
प्रेमात पडून दुःखी होता कश्याला राव
लुट मजा दुनियेची
प्रेमं बीम बाकी सब भाड मै जाव
उगाचच काहीतरी ......म्हणजे मला वाटलेलं ,नाहीत्या वेळी सुचलेल काही तरी आहे,हे काहीतरी म्हणजे काय ते आजून मला कळलेल नाही,त्यामुळे ते इतरांना काळाव आशी अपेक्षा मी करत नाही.विवध वेळी, कधी कोणाची खेचायला,कोणाला त्रास द्यायला नाहीतर इतर कोणा कारणाने उगाचच लिहिलेले हे काही तरी हे पुढे आहे , उगाचच वेळ असेल तर वाचा, नसेल तर वेळ उगाचच मिळेल तेव्हा वाचा आणि उगाचच्या उगाचच काही तरी मानून सोडून द्या .
Monday, June 20, 2011
Thursday, June 9, 2011
पिंजऱ्यातला कावळा
शंभर कावळे एकदम बावळे
बसले एका तारेवर
गोंधळ जाम ,
काव काव फार ,
पत्ता नाही कसलाच राव
एक म्हणाला संप करू,
दुसरा म्हणाला का ?
घाबरत घाबरत कुणी म्हणालं "याची गरज आहे तरी का ?"
"कोण म्हणाल गरज नाही ?""तुम्हाला काही समज नाही "
पिंडाचा तो सुका भात खावून झाली निर्बुद्ध जात
करा संप ,नका शिऊ पिंड ,
कळू दे या माणसांना
कावळ्याची जात नाही लाचार
बळी नाही पडणार सुग्रास भोजनाला
शंभर कावळे एकदम बावळे
चर्चा करती जोरात
कधी हो ,कधी ना,
मते शेकडो ना ना
निर्णय झाला अखेर
संपाला नाही पर्याय
संप झाला सुरु ,
तेव्हड्यात आले मयत,
झाले सारे विधी
ठेवला गेला घास
कावळ्या मध्ये मग झाला सुरु कलकलाट
पिंड होता सुग्रास फार ,
नुसता फक्त त्यात भात
कावळे पाहती
नुसते हळहळती,
कसे शिवावे पिंडाला
दुपार झाली
पिंड सुकला ,
माणसे होती खोळंबली
उपाय करती नाना
कावळे काही येई ना
अखेरचा उपाय
किरवंत उठला
निरोप धाडला घरी
धावत आले पोरगे
हातात पिंजरा घेवून
शंभर कावळे एकदम बावळे
बघती टकमक पिंजऱ्याला
चकित सारे
पाहती जेव्हा आतल्या कावळ्याला
शंभर कावळे एकदम बावळे
घाबरले त्या पक्षाला
पिंजरा उघडण्या आधीच धावले
शिवण्या सुक्या पिंडाला
माणसे उठली,
किरवंत सुटला
पिंजऱ्यातला कावळा हसत सुटला
बसले एका तारेवर
गोंधळ जाम ,
काव काव फार ,
पत्ता नाही कसलाच राव
एक म्हणाला संप करू,
दुसरा म्हणाला का ?
घाबरत घाबरत कुणी म्हणालं "याची गरज आहे तरी का ?"
"कोण म्हणाल गरज नाही ?""तुम्हाला काही समज नाही "
पिंडाचा तो सुका भात खावून झाली निर्बुद्ध जात
करा संप ,नका शिऊ पिंड ,
कळू दे या माणसांना
कावळ्याची जात नाही लाचार
बळी नाही पडणार सुग्रास भोजनाला
शंभर कावळे एकदम बावळे
चर्चा करती जोरात
कधी हो ,कधी ना,
मते शेकडो ना ना
निर्णय झाला अखेर
संपाला नाही पर्याय
संप झाला सुरु ,
तेव्हड्यात आले मयत,
झाले सारे विधी
ठेवला गेला घास
कावळ्या मध्ये मग झाला सुरु कलकलाट
पिंड होता सुग्रास फार ,
नुसता फक्त त्यात भात
कावळे पाहती
नुसते हळहळती,
कसे शिवावे पिंडाला
दुपार झाली
पिंड सुकला ,
माणसे होती खोळंबली
उपाय करती नाना
कावळे काही येई ना
अखेरचा उपाय
किरवंत उठला
निरोप धाडला घरी
धावत आले पोरगे
हातात पिंजरा घेवून
शंभर कावळे एकदम बावळे
बघती टकमक पिंजऱ्याला
चकित सारे
पाहती जेव्हा आतल्या कावळ्याला
शंभर कावळे एकदम बावळे
घाबरले त्या पक्षाला
पिंजरा उघडण्या आधीच धावले
शिवण्या सुक्या पिंडाला
माणसे उठली,
किरवंत सुटला
पिंजऱ्यातला कावळा हसत सुटला
Subscribe to:
Posts (Atom)