काल माझ्या घरी माझे दोन लेखक मित्र आले , सहजच. पाच दहा मिनिटात निघू म्हणाले आणि दुपारी जेवायलाच थांबले. चागली चार पाच तास चर्चा सुरु होती त्यांची. मी मात्र श्रोत्याच्या भूमिकेत शांत बसलो होतो . घरचे जरा वैतागलेले वाटले पण मी त्याचं कडे दुर्लक्ष केलं. ४ वाजता चहा घेताना दोघांच एकमत झाल की आजकाल दर्जेदार साहित्य बांधलं जात नाही म्हणून . दोघेही हळहळले, आणि जाताजाता तू हि काहीतरी केलं पाहिजे अस माझ्याकडे बघत बोलले. ते गेल्यावर मी पण निश्चय केला, काही तरी करूया असा, समोरच माझ्या लेखक मित्रांची पुस्तके होती ती मी एकत्र केली, खणातून जुनी साठवलेली वर्तमानपत्रे काढली आणि पुस्त्काबोबत घट्ट बांधून टाकली . साहित्य कसदारपणे बांधल म्हणून मी खुश , घरची रद्दी एकत्र झाली म्हणून घरचे खुश .
No comments:
Post a Comment