भर पावसात चिंब भिजूनही मी सुकाच,
खडकात दबलेल्या बेडकीगत
जगापासून दूर , खूप अलिप्त
तरीही मेंढरागत एकसंघ चालतोय
कुणाच्या तरी पाठीमागे
का कुणास ठाऊक
कदाचित जनरीत म्हणून
बंध झुगारीन म्हणतोय
पण हिम्मत होत नाही
कदाचित अंगात जोर नाही
किवां वेडा म्हणून वाळीत पडण्याची भीती
असं असत्य किती वेळ जगू
की वेडा ठरून आपल्या मार्गाने चालू
विचार करतानाही मी घाबरलोय
आजून ही चालतोय मेंढरागत
कुणाच्या तरी पाठीमागे.
उगाचच काहीतरी ......म्हणजे मला वाटलेलं ,नाहीत्या वेळी सुचलेल काही तरी आहे,हे काहीतरी म्हणजे काय ते आजून मला कळलेल नाही,त्यामुळे ते इतरांना काळाव आशी अपेक्षा मी करत नाही.विवध वेळी, कधी कोणाची खेचायला,कोणाला त्रास द्यायला नाहीतर इतर कोणा कारणाने उगाचच लिहिलेले हे काही तरी हे पुढे आहे , उगाचच वेळ असेल तर वाचा, नसेल तर वेळ उगाचच मिळेल तेव्हा वाचा आणि उगाचच्या उगाचच काही तरी मानून सोडून द्या .
Monday, October 17, 2011
Saturday, August 20, 2011
Monday, June 20, 2011
भाड मै जाव
प्रेमाच्या या खेळामध्ये सगळे मजनू आंधळे,
गाढवालाही फुटतात मग इश्कचे धुमारे,
म्हैस इथे सुंदर वाटे प्रत्येक रेड्याला
उपचार नाही खर सांगतो आश्या वेडाला.
प्रेमाच्या युद्धात प्रत्येक रोमियो शहीद
फायदा नाही इथे काहीच
घाट्याचा मात्र डोंगर ढीग
म्हणून म्हणतो प्रेमात पडून
नुकसान कश्याला सोसा
ढोसायची आहेच तर मग happy होऊन ढोसा
प्रेमात पडून दुःखी होता कश्याला राव
लुट मजा दुनियेची
प्रेमं बीम बाकी सब भाड मै जाव
गाढवालाही फुटतात मग इश्कचे धुमारे,
म्हैस इथे सुंदर वाटे प्रत्येक रेड्याला
उपचार नाही खर सांगतो आश्या वेडाला.
प्रेमाच्या युद्धात प्रत्येक रोमियो शहीद
फायदा नाही इथे काहीच
घाट्याचा मात्र डोंगर ढीग
म्हणून म्हणतो प्रेमात पडून
नुकसान कश्याला सोसा
ढोसायची आहेच तर मग happy होऊन ढोसा
प्रेमात पडून दुःखी होता कश्याला राव
लुट मजा दुनियेची
प्रेमं बीम बाकी सब भाड मै जाव
Thursday, June 9, 2011
पिंजऱ्यातला कावळा
शंभर कावळे एकदम बावळे
बसले एका तारेवर
गोंधळ जाम ,
काव काव फार ,
पत्ता नाही कसलाच राव
एक म्हणाला संप करू,
दुसरा म्हणाला का ?
घाबरत घाबरत कुणी म्हणालं "याची गरज आहे तरी का ?"
"कोण म्हणाल गरज नाही ?""तुम्हाला काही समज नाही "
पिंडाचा तो सुका भात खावून झाली निर्बुद्ध जात
करा संप ,नका शिऊ पिंड ,
कळू दे या माणसांना
कावळ्याची जात नाही लाचार
बळी नाही पडणार सुग्रास भोजनाला
शंभर कावळे एकदम बावळे
चर्चा करती जोरात
कधी हो ,कधी ना,
मते शेकडो ना ना
निर्णय झाला अखेर
संपाला नाही पर्याय
संप झाला सुरु ,
तेव्हड्यात आले मयत,
झाले सारे विधी
ठेवला गेला घास
कावळ्या मध्ये मग झाला सुरु कलकलाट
पिंड होता सुग्रास फार ,
नुसता फक्त त्यात भात
कावळे पाहती
नुसते हळहळती,
कसे शिवावे पिंडाला
दुपार झाली
पिंड सुकला ,
माणसे होती खोळंबली
उपाय करती नाना
कावळे काही येई ना
अखेरचा उपाय
किरवंत उठला
निरोप धाडला घरी
धावत आले पोरगे
हातात पिंजरा घेवून
शंभर कावळे एकदम बावळे
बघती टकमक पिंजऱ्याला
चकित सारे
पाहती जेव्हा आतल्या कावळ्याला
शंभर कावळे एकदम बावळे
घाबरले त्या पक्षाला
पिंजरा उघडण्या आधीच धावले
शिवण्या सुक्या पिंडाला
माणसे उठली,
किरवंत सुटला
पिंजऱ्यातला कावळा हसत सुटला
बसले एका तारेवर
गोंधळ जाम ,
काव काव फार ,
पत्ता नाही कसलाच राव
एक म्हणाला संप करू,
दुसरा म्हणाला का ?
घाबरत घाबरत कुणी म्हणालं "याची गरज आहे तरी का ?"
"कोण म्हणाल गरज नाही ?""तुम्हाला काही समज नाही "
पिंडाचा तो सुका भात खावून झाली निर्बुद्ध जात
करा संप ,नका शिऊ पिंड ,
कळू दे या माणसांना
कावळ्याची जात नाही लाचार
बळी नाही पडणार सुग्रास भोजनाला
शंभर कावळे एकदम बावळे
चर्चा करती जोरात
कधी हो ,कधी ना,
मते शेकडो ना ना
निर्णय झाला अखेर
संपाला नाही पर्याय
संप झाला सुरु ,
तेव्हड्यात आले मयत,
झाले सारे विधी
ठेवला गेला घास
कावळ्या मध्ये मग झाला सुरु कलकलाट
पिंड होता सुग्रास फार ,
नुसता फक्त त्यात भात
कावळे पाहती
नुसते हळहळती,
कसे शिवावे पिंडाला
दुपार झाली
पिंड सुकला ,
माणसे होती खोळंबली
उपाय करती नाना
कावळे काही येई ना
अखेरचा उपाय
किरवंत उठला
निरोप धाडला घरी
धावत आले पोरगे
हातात पिंजरा घेवून
शंभर कावळे एकदम बावळे
बघती टकमक पिंजऱ्याला
चकित सारे
पाहती जेव्हा आतल्या कावळ्याला
शंभर कावळे एकदम बावळे
घाबरले त्या पक्षाला
पिंजरा उघडण्या आधीच धावले
शिवण्या सुक्या पिंडाला
माणसे उठली,
किरवंत सुटला
पिंजऱ्यातला कावळा हसत सुटला
Saturday, May 28, 2011
विचार
आज दोन दिवस झाले आजून ही मी विचारच करतोय, पुष्कळ झालं विचार करून आता लिहावच असा निश्चय करून मी लिहायला बसलोय, पण लिहू तरी काय? आजूनही मी भरकटलेलाच आहे माझ्या विचारांत, पण या आधी ही मी विचार करत होतोच की, फक्त आता मी त्यांच्या कडे लक्ष देतोय.विचारांच्या विचाराने मी खूप संभ्रमात पडलोय, खरच आपले विचार भरकटलेले आसवे का ? की आपण ज्याला भरकटलेल म्हणतोय ते भरकटलेल नाहीच , ते आपल्यालाच असं वाटतंय, प्रत्येक गोष्टी ला काही तरी एक अर्थ असतो , मग माझ्या प्रत्येक विचारला ही असायला हवा, मग ते भरकटलेल्या सारखे का वाटतात? का मलाच तसं वाटतंय.पण वाटतंय म्हणजे तरी काय, तो ही एक विचारच आहे की. काही ही असो मी विचार तरी करतोय.
मनात शेकडो विचार भरून राहिलेत, मग कश्या पासून सुरुवात करावी बर, अगदी आताच सुचलेल्या गोष्टी पासून की फार पूर्वीच्या, काही तरी सुरुवात करायला पाहिजे.
पण नेमक लिहाव तरी काय ?
मी आजूनही विचारच करतोय .........
मनात शेकडो विचार भरून राहिलेत, मग कश्या पासून सुरुवात करावी बर, अगदी आताच सुचलेल्या गोष्टी पासून की फार पूर्वीच्या, काही तरी सुरुवात करायला पाहिजे.
पण नेमक लिहाव तरी काय ?
मी आजूनही विचारच करतोय .........
Wednesday, May 25, 2011
भरकटलेला मी
खूप विचार करून तीन चार ओळी सुचल्यावर असं लक्ष्यात आले की मी पहिल्या ओळीच विसरलोय,नेमका मुळचा विषयच विसरल्यावर आता लिहू तरी काय?, मग पुन्हा विचार सुरु केला,"कश्यावर लिहाव बरं?"आणि पुन्हा माझी गाडी भरकटली. विचारांचं हे असच असतं,नेमके कधी भरकटतील याच नेम नसतो, कधी कुठला रोड पकडतील ,आडवाटेने कल्टी घेतील सांगता येत नाही. तसा आता ही मी थोडा भरकटलोय, मग असं भरकटलेलच का बर नको लिहू, काय वाईट आहे त्यात ,एक नव ट्राय, बघूया जमतंय का, आणि नाही जमलं तर काय फरक पडतोय भरकटलेलच तर लिहितोय, चुकलो तरी कोणी फासावर लटकवणार नाही, आही खूप चांगल लिहिलय म्हणून काही मोठा सन्मान ही होणार नाही, मग जिथे काहीच मिळत नाही असा उपदव्याप कश्या करिता. उत्तर सोपं आहे "मला माहित नाही." जसं जमेल तसं लिहिणार,जेव्हा जमेल तेव्हा लिहिणार पण काय लिहिणार ते मात्र माहित नाही आणि तसं ही भरकटलेल्या विचारांना दिशाची माहिती हवी तरी कश्याला, जसं वाहतोय तसं वाहवत जावं, मुक्त राहावं, त्यातच माझं आणि त्याचं भलं आहे.
Subscribe to:
Posts (Atom)